नवी दिल्ली – हिंदी महासागरात चीनची वाढती घुसखोरी आणि आक्रमकता पाहता, त्या भागात नाविक दल अधिक सक्षम गरजेचे आहे. असे चीनचे आव्हान लक्षात घेता भारताच्या तीनही दलांचे प्रमुख जनरल बी. के. रावत यांनी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येथे सामरिक तळ बनवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. जगात दबदबा निर्माण करण्यासाठी सध्या विविध मोहिमांच्या समर्थनार्थ हिंदी महासागरात अतिरिक्त प्रादेशिक दलांच्या 120 पेक्षा जास्त युद्धनौका तैनात केल्या आहेत.
रावत पुढे म्हणाले की, या भागात आपली हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत आहे. आम्हाला अतिरिक्त प्रादेशिक शक्ती, प्रादेशिक संपर्क आणि सहकार्यात्मक संबंधांसह धोरणात्मक स्वायत्तता राखणे आवश्यक आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत (जेएआय), भारत-आसियानसारख्या विद्यमान यंत्रणांचे योग्य संतुलन राखण्यासाठी आपल्याला द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. सैन्य क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही प्रदेशात कोणत्याही देशाचे वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. म्हणूनच संशोधन आणि विकासातील गुंतवणूक कोणत्याही उद्योगासाठी भविष्यातील कृती निश्चित करेल.
मोठ्या प्रमाणावर वाद असतानाही आतापर्यंत या भागात शांतता असल्याचे रावत यांनी जागतिक संवाद सुरक्षा परिषदेत सांगितले.
रावत आपल्या भाषणात असेही म्हणाले की, सैन्यात तंत्रज्ञान हे कोणत्याही समस्येच्या निराकरण असले पाहिजे, विनाशासाठी नाही. सुरक्षेबाबतचा आपला दृष्टिकोन एकतर्फी असू नये. यासाठी प्रयत्न करण्याचे बरेच मार्ग आहेत. भविष्यात सुरक्षा बळकट करण्यासाठी मित्र देशांसोबत प्रशिक्षण घेण्यासारख्या घडामोडी वाढवण्याची गरज आहे.