मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा बिनबुडाच्या असून निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.
नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले कि, काही जण १२ राष्ट्रवादी आमदार भाजपमध्ये जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त निराधार आहे. याउलट निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020
दरम्यान, ‘ऑपरेशन लोटस’ करून महाविकास आघाडी सरकार पाडायचे, असा कट रचला जात असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.