राजस्थान – जयपूर शहरातील पावटा गावात दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गावातील काही गावकरांनी दलित व्यक्तीनं घोड्यावर बसून लग्न करण्यावर आक्षेप घेतला होता. जेव्हा गावातून या दलित व्यक्तीची वरात निघाली त्यावेळी गावातीलच काही खोडकर लोकांनी दगडफेक केली.
या संपूर्ण बाबत स्थानिक पोलिसांनी दलित वराच्या मिरवणुकीवर कथित दगडफेकीनंतर पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. तसेच या संपूर्ण घटनेबाबत सांगितले की, गावातून घोड्यावर वरात काढ्यावरून या आधीही काही लोकांकडून आक्षेप घेतला होता. यावेळी असेच झाले मात्र याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र वरातीत काही लोकांनी जमावावर दगडफेक केली. या घटनेत 12 जण जखमी झाले
दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक आमदाराने पोलिसांकडून लग्नाच्या वरातीच रक्षण करण्यात अपयशी ठरल्यामुळे निलंबित करण्याची मागणी केली आहे.