जयपूर – आपले अभियांत्रिकीचे शिक्षण सुरु असताना “सिमी’ या दहशतवादी संघटनेचे काम करत असल्याच्या आरोपावरुन येथील 13 पैकी 12 विद्यार्थ्यांना आजन्म कारावास अर्थात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या जिल्हा न्यायालयाने सिमीच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. न्यायालयाने या सर्वांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली असून, एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे सर्व इंजीनिअरिंगचे विद्यार्थ्यी, दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनसाठी काम करायचे. यांना वर्ष 2014 मध्ये एटीएसने (ATS) अटक केली होती. दहशतवादी घोषित झालेल्या आरोपींपैकी 6 सीकरचे, 3 जोधपूरचे, दोघे जयपूर, एक पाली आणि एक बिहारमधील गयाचा आहे.
राजस्थानमध्ये सिमीच्या स्लीपर सेलशी संबंधित हे प्रकरण 7 वर्षांपूर्वीचे आहे. दिल्लीमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थानमध्ये ATS आणि SOG पथकांनी 2014 मध्ये जयपुर, सीकर आणि इतर काही जिल्ह्यातील 13 संशयितांना पकडले होते. यांच्यावर आरोप होता की, हे सर्व बंदी घातलेली संघटना सिमीशी संबंधित असून, राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आले होते.
तेव्हा ATS ने दावा केला होता की, सिमीच्या स्लीपर सेलला ऍक्टिव्ह करण्यासाठी जयपुरमधून अटक झालेल्या मारुफचा नातेवाई उमरने इंटरनेटद्वारे यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर हे आरोपी ऍक्टिव्ह होऊन दहशतवादी कारवाया करू लागले. यादरम्यान या सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची मागील सात वर्षांपासून सुनावणी सुरू होती. याप्रकरणी जोधपूरचा रहिवासी असलेला मश्राफ इक्बाल, वय 32 वर्षे हा सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला आहे.
या प्रकरणात दोषीची नावे
1. मोहम्मद अम्मार यासीर (22 वर्षे, गया, बिहार)
2. मोहम्मद सज्जाद (32 वर्षे)
3. मोहम्मद अकीब (22 वर्षे)
4. मोहम्मद उमर (18 वर्षे)
5. अब्दुल वाहिद घौरी (24 वर्षे)
6. मोहम्मद वकार (22 वर्षे)
7. अब्दुल माजिद उर्फ अडास (21 वर्षे, सर्व जण सिकर)
8. मोहम्मद मारुफ (23 वर्षे, जयपूर)
9. मोहम्मद वकार (20वर्षे, पाली)
10. बरकत अली (28 वर्षे)
11. मोहम्मद साकीब अन्सारी (25 वर्षे)
12. अशरफ अली खान (40 वर्षे, तिघेही जोधपूर).