जिल्ह्यातील 189 उमेदवारांपैकी 66 जणांची माघार
नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 189 उमेदवारांपैकी 66 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता रिंगणात 116 उमेदवार राहिले आहेत. एकूण 202 उमेदवारांचे अर्ज आले होते.छाननीत 13 जणांचे अर्ज बाद झाल्याने 189 उमेदवार रिंगणात होते.मात्र माघारीच्या दिवशी यातील 66 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
नगर शहर मतदारसंघातून श्रीराम जनार्दन येंडे (अपक्ष) व संजय एकनाथ कांबळे (अपक्ष) या दोघांनी माघार घेतल्याने श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष), किरण गुलाबराव काळे (वंचित बहुजन आघाडी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), सुनिल सुरेश फुलसौंदर (अपक्ष), सचिन बबनराव राठोड (अपक्ष), , श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), प्रतीक बारसे (अपक्ष), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम) हे 12 उमेदवार रिंगणात आहेत.
संगमनेर मतदारसंघातून सूर्यभान बाबूराव गोरे (बसपा),सचिन मारूती शिंदे (अपक्ष),शोभा संजय फड (अपक्ष), या तिघांनी माघार घेतल्याने आता विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय क़ॉग्रेस), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), बापू पाराजी रणधीर (अपक्ष),अविनाश हौशीराम भोर (अपक्ष), कलीराम बहिरु पोपळघट (अपक्ष), शरद ज्ञानदेव गोर्डे (मनसे), बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित बहुजन आघाडी), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी) हे आठ उमेदवार रिंगणात आहेत.
श्रीरामपूर मतदारसंघातून चेतन सदाशिव सदाशिव लोखंडे यांच्यासह तब्बल 21 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. ऍड. अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पार्टी) कानडे लहू नाथा (भारतीय राष्ट्रीय कॉंगेस), पगारे भाऊसाहेब शंकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), अशोकराव रामचंद्र आल्हाट-(जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), जाधव रामचंद्र नामदेव (अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर(अपक्ष) हे 11 उमेदवार आता रिेंगणात आहेत.
अकोले मतदारसंघातून दोघांनी माघार घेतल्याने आता चार उमेदवार रिंगणात आहेत. शिर्डी मतदारसंघातून तिघांनी माघार घेतल्याने आता पाच उमेदवार रिंगणात आहेत. कोपरगाव मतदारसंघातून 8 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 14 उमेदवार रिंगणात उरले आहेत.नेवासा मतदारसंघातून तिघांनी माघार घेतल्याने 17 उमेदवार रिंगणात आहेत.शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून सात जणांनी माघार घेतल्याने9 उमेदवार रिगणात आहेत.
राहुरी मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतल्याने सात उमेदवार रिंगणात आहेत. पारनेर मतदारसंघातून तिघांनी माघार घेतल्याने सहा उमेदवार रिंगणात आहेत. श्रीगोंदा मतदारसंघातून या पाच जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार रिेंगणात आहेत.कर्जत-जामखेड मतदारसंघातून चार अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार रिंगणात आहेत.
(उर्वरीत मतदारसंघातील माघार घेतलेले उमेदवार व रिंगणातील उमेदवारांचे वृत्त मुख्य अंकातील पान नं. 3 वर…)