मद्य पदार्थ आणि ड्रग्जचाही समावेश
मुंबई- देशात सर्वत लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगले आहे. त्यातच निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून महिन्याभरातच ‘हेराफेरी’ ला लगाम घातला आहे. यासाठी एक विशेष पथकाची स्थापना केली असून, या पथकाने काही दिवसांतच 112 कोटी रुपयांचा कला पैसा ताब्यात घेतला आहे.
या विशेष पथकाने 10 मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत राज्यातून 112 कोटी रुपये इतका काळा पैसा जप्त केला आहे. तर यामध्ये 21.24 कोटी रुपयांचं मद्य आणि 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.