मुंबई : लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम 188चे उल्लंघन केल्याप्रकरणी काल सायंकाळपासून ते आज दुपारपर्यंतच्या काळात तब्बल 1037 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 73 हजार 735 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या काळात सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. आजपर्यंत कोविड 19च्या अनुषंगाने पोलिसांकड 78 हजार 474 एवढ्या तक्रारी आल्या आहेत. यात क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी 610 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कुठेही पोलिसांवर हल्ला झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. गेल्या चोवीस तासात अवैध वाहतुकीची नवीन आठ प्रकरणे दाखल झाली असून आतापर्यंत त्यांची संख्या 1100 झाली आहे. नव्या आठ प्रकरणात 411 जणांना अटक करण्यात आली आहे.