रायगड: ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.