मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी नागपूर येथील देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. नुकतंच पोलीस विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला या सूचना देण्यात आल्या असून कामालाही सुरुवात देखील झाल्याचं दिसून आलं आहे.
येत्या 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, यंदाचं हे अधिवेशन नागपूर शहरात होणार आहे. आणि त्यानिमित्ताने सध्या मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवले जात आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बंगल्याची सुरक्षा वाढवल्याचं दिसून येत आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हं आहेत. शिवाय अधिवेशनावर असंख्य मोर्चे येणार असल्याने या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच आणि एक फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्याच्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा भिंतीवर काटेरी तार लावण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत. पहिल्यांदाच देवगिरी बंगल्याला इतकी मोठी सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आणि त्याच मुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू आहे.
दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वीच राज्यपालांना बदलण्याची शक्यता आहे. अन्यथा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी हा मुद्दा प्रामुख्यानं उचलणार असल्याचं बोललं जात आहे. आणि याच कारणावरून राज्यात पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तली जात आहे.