लोणी काळभोर-करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने शिक्षक व कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या पगारा इतके म्हणजे एक कोटी रुपये मुख्यमंत्री निधीसाठी देणार असल्याची घोषणा संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी केली.
डॉ. बापूजी साळवे यांच्या या विचाराला समोर ठेवून आजपर्यंत विवेकानंद शिक्षण संस्थेने भूकंपग्रस्त, पूरग्रस्त दुष्काळग्रस्त लोकांसाठी स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे. आजच्या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाइतकी म्हणजे सुमारे एक कोटी रुपये धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.