मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, तसेच आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने युतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचं ठरलंय त्याप्रमाणे होईल असे सांगत अजून काहीच स्पष्ट केलेले नाही. तत्पूर्वी रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली मागणी आधीच रेटून ठेवली आहे. आगामी महायुतीच्या सरकारमध्ये रिपाइंला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
Republican Party of India Chief Ramdas Athawal, in Ranchi: We demand one cabinet and one state minister berth in Maharashtra government. Amit Shah Ji will visit Mumbai to hold discussions with meet Uddhav Thackeray Ji on who all will be made minsters in the state cabinet. pic.twitter.com/yZfB5rmpv4
— ANI (@ANI) October 25, 2019
पुढे बोलताना आठवले म्हणाले की,आम्ही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईला येणार आहेत. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतली
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ५०-५० टक्कें फॉर्म्युलाची आठवण भाजपला करुन दिली आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशिवाय गत्यंतर नाही. हीच संधी साधत शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे.