नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या भारत देशातील प्रत्येत नागरिकासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी गरीब जनतेला प्राधान्य देत त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाच्या घोषणा करत अन्नधान्य पुरवठा आणि वित्तीय तुटवड्याची झळ या वर्गाला बसणार नाही याची काळजी घेतली.
देशभरातील जनतेसाठी तब्बल 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम विविध योजनांअंतर्गत या संघर्षाच्या काळात देशहितासाठी वापरण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिला, विधवा, दिव्यांग, अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी या सर्वांची काळजी केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे.
देशभरात लॉकडाऊन डाहीर केल्यानंतर सर्वतोपरींनी कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. त्यातच सीतारमण यांनी केलल्या या सर्व घोषणा पाहता देशातील एक मोठा वर्ग असणाऱ्या गरीब वर्ग आणि शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
अर्थमंत्र्यांच्या काही महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे-
-कष्टकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा.
-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा
-आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला 50 लाखांचा आरोग्य विमा. 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार इंशुरन्सची सेवा
-प्रत्येक गरिबाला 3 महिने 5 किलो अन्नधान्य मोफत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जाणार.
-मनरेगाच्या 5 कोटी मजुरांना योजनेचा लाभ
-विधवा, दिव्यांगांना 1 हजार रुपये देणार.
– 3 कोटी वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना मदत.
-अर्थमंत्र्यांकडून जनधन खातेधारक महिलांसाठीही मदतीची घोषणा
-नागरिकांनी विशेषत: गरीबांनी अन्न, धान्य आणि गॅस अर्थात इंधन पुरवठ्याची चिंता करु नये.
-उज्वला योजनेअंतर्गत महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार
सीतारामन
8.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 2000 रुपयांचा हफ्ता दिला जाईल, जेणेकरुन तातडीने फायदा मिळायला सुरुवात होईल.
देशात मनरेगा योजनेचा फायदा पाच कोटी कुटुंबांना मिळतो. मनरेगाची मजुरी आता 182 रुपयांनी वाढवून 202 रुपये करण्यात आली आहे.
जनधन योजनेत सुमारे साडे 20 कोटी महिलांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांपर्यंत डीबीटीद्वारे प्रत्येक महिन्यात 500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत.
सुमारे 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गंत 3 महिन्यांपर्यंत मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.