नवी दिल्ली – केवळ काही आठवड्यातच देशातील 15 लाख लोकांनी करोना आजारावरील विमा काढला आहे. ही माहिती विमा नियंत्रक इन्श्युअरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॅरिटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष सुभाष कुंथिया यांनी दिली.
अशा अडचणीच्या काळात विमा कंपन्यांनी नागरिकांना मदत होईल, असे काम केले तर दीर्घ पल्ल्यात नागरिकांचे आणि विमा कंपन्यांचे संबंध वाढतील असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला विमा कंपन्यांनी करोनावर विमा काढण्याबद्दल टाळाटाळ केली होती. मात्र, नंतर आम्ही करोना कवच, करोना रक्षक या पॉलिसी जारी करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना केल्या. विमा कंपन्यानी चांगला प्रतिसाद देऊन अल्पकाळातच या पॉलिसी ग्राहकांना उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.