नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या अधिकृत प्रचारासाठी शेवटचे काही तास उरल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलंय. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अधिकाधिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आता आपल्या ‘स्टार’ प्रचारकांना मैदानात उतरवण्यात आल्यानं दिल्लीच्या राजकीय मैदानात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत आहेत.
अशातच आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिल्लीमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. देशातील वाढत्या बेरोजगारीबाबतच्या एका अहवालाचा दाखल देत प्रियंका यांनी, “देशातील वाढती बेरोजगारी ही योगायोग आहे की प्रयोग? याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं.” अशी मागणी केली.
‘देशातील ७ क्षेत्रांमधील एकूण ३.५ कोटी रोजगार घटले आहेत मात्र पंतप्रधान याबाबत अवाक्षरही काढत नाहीत.’ असा आरोप देखील गांधी यांनी यावेळी बोलताना लगावला.