पिंपरी (प्रतिनिधी) -लॉकडाऊनमध्ये काही अटी-शर्थींवर शिथिलता आणली असली तरी सायंकाळी सात वाजल्यानंतर संचारबंदी आणि जमावबंदी कायम आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या 250 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 22) कारवाई
केली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातही लॉकडाऊनमध्ये बहुतांश प्रमाणात शिथिलता दिली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र काही नागरिक अद्यापही सरकारच्या या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. अशा नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे.
प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 250 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. 222) भोसरी एमआयडीसी (15), भोसरी (3), पिंपरी (33, चिंचवड (48), निगडी (24), आळंदी (12), चाकण (2), दिघी (13), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (8), वाकड (39), हिंजवडी (5), देहूरोड (10), तळेगाव दाभाडे (11), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (12), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (9) अशी एकूण 250 जणांवर कारवाई केली आहे.