पुणे – रिक्षा चालकांना आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफ करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
रिक्षा चालकांना प्रति महिना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे, मुक्त रिक्षा परवाने बंद करावेत, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, रिक्षा चालक मालकांना विमा मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.