गर्दीच्या नियंत्रणासाठी सर्वानुमते निर्णय
आळंदी – माऊलींच्या पालखी प्रस्थाना दरम्यान मानाच्या 47 दिंड्यांमधील प्रत्येक दिंडीतील शंभर वारकरी सोडले जाणार आहेत. यामुळे गर्दी नियंत्रणात येणार असून अगोदरच गर्दीचा अंदाज असल्याने प्रस्थान सोहळा निर्विघ्न पार पडण्यास मदत होईल असा दावा पोलीस प्रशासन करत आहे. त्याबाबतची समन्वय बैठक सोमवारी (दि. 10) देवस्थानच्या भक्त निवास हॉल मध्ये झाली.
यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र चौधर, विवेक लावंड, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालिका अधिकारी किशोर तरकसे, अशोक राजगुरू आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिंडी प्रमुख, वारकरी उपस्थित होते.
बैठकीत वारकऱ्यांची संख्या मर्यादा शंभर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दिंडी प्रमुखांनी संख्या मर्यादित करण्यामागचा अडचणी स्पष्ट केल्या तसेच पोलिसांनी केलेले पास देण्याचे आवाहन देखील नाकारले. संख्या मर्यादित करण्याबाबत जो निर्णय सर्वानुमते घेतला जाईल, तो मान्य केला जाईल असे स्पष्ट केले. याबाबत सर्वच दिंडीप्रमुख सोहळ्याच्या आदल्या दिवशी (दि. 24जून) आळंदीत दाखल होणार असल्याने तेव्हा बैठक घेत संख्येबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
आळंदी, दि. 10 (वार्ताहर) -माऊलींच्या पालखी प्रस्थाना दरम्यान मानाच्या 47 दिंड्यांमधील प्रत्येक दिंडीतील शंभर वारकरी सोडले जाणार आहेत. यामुळे गर्दी नियंत्रणात येणार असून अगोदरच गर्दीचा अंदाज असल्याने प्रस्थान सोहळा निर्विघ्न पार पडण्यास मदत होईल असा दावा पोलीस प्रशासन करत आहे. त्याबाबतची समन्वय बैठक सोमवारी (दि. 10) देवस्थानच्या भक्त निवास हॉल मध्ये झाली.
यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र चौधर, विवेक लावंड, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालिका अधिकारी किशोर तरकसे, अशोक राजगुरू आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिंडी प्रमुख, वारकरी उपस्थित होते. बैठकीत वारकऱ्यांची संख्या मर्यादा शंभर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दिंडी प्रमुखांनी संख्या मर्यादित करण्यामागचा अडचणी स्पष्ट केल्या तसेच पोलिसांनी केलेले पास देण्याचे आवाहन देखील नाकारले. संख्या मर्यादित करण्याबाबत जो निर्णय सर्वानुमते घेतला जाईल, तो मान्य केला जाईल असे स्पष्ट केले. याबाबत सर्वच दिंडीप्रमुख सोहळ्याच्या आदल्या दिवशी (दि. 24जून) आळंदीत दाखल होणार असल्याने तेव्हा बैठक घेत संख्येबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.