मुर्टी- जिरायती भागातील विहिरी, नाले, ओढे, तलावांनी तळ गाठल्याने ग्रामस्थ चिंताग्रास्त झाले आहेत. दरम्यान, भोईटी वाडी परिसरात शासनाच्या एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हा टॅंकर आठवड्यातून एकदा येत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून त्यांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याने चाऱ्यांच्या पेंड्या वाजवी दराने विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. दरम्यान, आठवड्यातून एकदाच टॅंकर येत असल्याने क्षणार्धात टॅंकरभवोती गर्दी होत असल्याने भांडणे होण्याची शक्यता असल्याने जादा टॅंकरच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.