खूप भूक लागल्यावर राग येतो आणि चिडचिड होते. वैज्ञानिकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. वैज्ञानिकांच्या मते, असं परस्पर क्रिया, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे घडतं. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाइनाच्या जेनिफर मॅकोर्माक नावाच्या डॉक्टर विद्यार्थीनीनं याचं कारण सांगितलं आहे.
आपल्याला भूक लागल्यानंतर आपल्या भावना आणि दुनियेबद्दल आपले विचार वाढत जातात. “हंगरी’ हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात स्वीकारण्यात आला असून, भूकेने येणाऱ्या रागाला या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे, असं जेनिफरनं स्पष्ट केलं आहे. तसंच 400 लोकांचं निरीक्षण केल्यानंतर केवळ वातावरणाचा परिणाम होत नाही तर त्याबरोबर भावनेलादेखील तितकेच महत्त्व असल्याचं तिनं सांगितलं.
याबाबतीत जास्त जागरूक असलेल्या लोकांना अर्थात भूक लागली आहे हे कळत असलेल्यांना राग कमी येतो असंही स्पष्ट झालं आहे. तर “इमोशन’ जर्नलनं प्रकाशित केल्याप्रमाणं जेनिफरच्या मते, भूकेशी जोडलेल्या नेमक्या भावना काय आहेत, याचा अभ्यास करणं हेच उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. राग येण्याचे संकेत ओळखणे गरजेचे आहे. असे संकेत दिसायला लागल्यानंतर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. राग आला असला तरीही सकारात्मक दृष्टीनं मांडल्यास, समोरचा दुखावला जाणार नाही. त्यामुळं त्यादृष्टीनं प्रयत्न करावा.