आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परंपरेने चालत आला आहे. या सोहळ्यात माउलींची पालखी सुगंधी करण्याचे काम येथील गरुड परिवार स्वखर्चाने गेल्या 30 वर्षांपासून अव्यहतपणे करीत आहे. यंदाही त्यांनी ही परंपरा जपली आहे.
आळंदी ते पंढरपूर पुन्हा पंढरपूर ते आळंदी अशी सेवा करीत आहे, नानासाहेब गरुड यांचे गेल्या सहा महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले. यापुढे प्रतिवर्षीप्रमाणे माउलींची पालखी सुगंधी करण्याचे काम हे त्यांचे दोन सुपुत्र सुदीप व प्रदीप ही परंपरा कायम पुढे सुरू ठेवणार असल्याचे सुदीप गरुड यांनी सांगितले. आळंदीत प्रस्थान काळात निरनिरांळी रंगिबिरंगी, सुवासिक फुले वापरून त्यासाठी सुमारे 10 कामगार यांच्या मदतीने पालखी सुगंधी करण्याचे काम सुरू असते. नानासाहेब गरुड हे माउलींचे निस्सीम भक्त होते त्यांचा वारसा पुढे तसाच सुरू ठेवणार असल्याचे गरुड परिवाराकडून सांगण्यात आले. माउलींची पालखी नियमित रंगीबिरंगी सुगंधी फुलांनी सजवण्यासाठी गरुड परिवार स्वखर्चाने पुणे येथील मार्केटयार्ड मधून नियमित फुलांची खरेदी करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी संपूर्ण रात्रभर पालखी सजवण्यासाठी कारागिरांमार्फत फुले जोडण्याचे काम केले जाते. ही सुगंधी फुलांनी सजविलेली पालखी ही लाखो वैष्णवांचे आकर्षण ठरते.