विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन
मंचर- जारकरवाडी गावासह पूर्व भागातील गावांसाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या जातील, असे आश्वासन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील यांच्या नियोजित लोणी-धामणी गावचा दुष्काळी भागाचा दौरा होता. त्यावेळी त्यांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी गावाला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी दुष्काळाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांनी यावर्षी पाणी आणि चारा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हरिश्चंद्र वणवे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.