नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे कोणत्याही संघटीत शक्ती नसून समाज खमटकांनी ही दंगल घडवली असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. विधानसभेत त्यांनी हिंसाचाराबाबात निवेदमन केले. त्यावेळी त्यांनी हे निवेदन केले.
दिल्लीत सुरू असणारा हिंसाचार सामान्य नागरिकांना नको आहे. दिल्लीतील नागरिकांना हिंसाचार नको आहे. हा हिंसाचार सर्वसामान्य नागरिकांनी केलेला नाही. हा हिंसाचार समाजविघातक, राजकीय गटांकडून केला गेला आहे. दिल्लीतील हिंदू आणि मुस्लिमांना हिंसाचार नको आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
या हिंसाचारामध्ये ठार झालेले हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात यावे, अशी अपेक्षाही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.
काल रात्रभर आपण अनेक गटांच्या संपर्कात होतो. हिंसाचारात जखमी झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांचीही आपण भेट घेतली. सतर्क रहावे, अशीच परिस्थिती आहे. पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करूनही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिस्थिती आटोक्यात आणता येईल, असा आत्मविश्वासही पोलिसांना वाटत नाही. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करावे आणि तणाव असलेल्या भागात ताबडतोब संचारबंदी लागू कराला पाहिजे. यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहीले असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.