मिथिलेश जोशी
नेता आणि वाटाघाटी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर आहेत, असा उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात त्यांनी आपल्या दौऱ्याचे कारण स्पष्ट करत सौम्य मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवले. त्यांनी व्यापाराच्या काही नाजूक मुद्यांवर प्रकाश झोत टाकला. पाकिस्तानच्या भूमीवर होणारा दहशतवाद अीाण सीएएसारख्या मुद्यावर मोदी यांना पाठींबा दर्शवला. आपला दौरा आटोपण्यापुर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी यांची स्तुती केली. त्याचवेळी यावर्षी होणाऱ्या त्यांच्या निवडणुकीत उपयोगी पडावी म्हणून कणखर राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून होत असलेल्या आंदोलनाबाबत ट्रम्प म्हणाले, आम्ही धार्मिक स्वातंच्या बाबत चर्चा केली. धार्मिक स्वातंत्र्यासाठी भारत आग्रही आहे. त्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत, असे मोदी यांनीसांगितले आहे. या कायद्यावरून मुस्लीमांना मोदी सरकार लक्ष्य बनवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. त्यानंतरव त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले, या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही. ते भारतावर सोडाबे असे मला वाटते. ते त्यांच्या नागरिकांसाठी योग्य तो निर्णय घेतील.
मुस्लिमांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याच्या आरोपाबाबत ट्रम्प म्हणाले, आम्ही या मुद्यावर चर्चा केली. आम्ही मुस्लिम आणि ख्रिस्तींबाबत चर्चा केली. त्यावेळी मोदी म्हणाले, भारतात 20 कोटी मुस्लीम गुण्यागोविंदाने रहात आहेत. आपण मुस्लिम समुदायासोबत कार्यरत आहोत. पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांबाबत ते म्हणाले या बाबींची काळजी घेण्यास मोदी सक्षम आहेत.मात्र त्यावेळी काश्मिर प्रश्नावर मध्यस्थाची भूमिकेच्या प्रश्नावर त्यांचा काही काळ गोंधळ झाला.
ते म्हणाले, आम्ही पाकिस्तानवर खूप चर्चा केली. आमचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. आम्ही त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चार्च केली. जर दहशतवाद ही समस्या असेल तर त्यावर ते काम करत आहेत. या दोन्ही सद्गृहस्थांसोबत माझे खूप चांगले संबंध असल्यामुळे मी माझ्याकडून होईल ती मदत करू शकेनन असे मी सांगितले. पण तेथे पाकिस्तानात काही समस्या आहेत. पण त्याबाबत काय करता येईल ते आम्ही पहात आहोत. मला जे करता येईल मध्यस्थी अथवा वाटेल ते मी करेन
ुपुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील राजनैतिक संबंध संपुष्टात आले आहेत. त्यामुळे इम्रान खान आणि मोदी यांच्यात ट्रम्प मध्यस्थी करू इच्छितात, असे त्यांना म्हणायचे होते असे वाटते मात्र याबाबत थेट विचारले की 2019मध्ये आपण काश्मिर प्रश्नावर दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव कायम आहे का? ते म्हणाले, मी काश्मिर प्रश्मावर मध्यस्थी करेन असे मी म्हणालो नाही. मी माध्यामांना म्हणालो होतो, काश्मिर ही भारत आणि पाकिस्तानातील मुख्य समस्या आहे. या समस्येवर काम करायला हवे. हा पेच सोडवण्यासाठी दीर्घकाळ काम सुरू आहे.
दहशतवादाला हाताळताना मोदी हे पुरेसे कणखर आहेत. ते खूप धार्मिक आहेत. ते खूप शांत आहेत मात्र त्याचवेळी प्रत्यक्षात खूप कणखर आहेत. दहशतवादाचा प्रश्न हाताळण्यास ते सक्षम आहेत अशी शाबासकीची थापही दिली.
थोडक्यात, 3 अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार करून ट्रम्प परत गेले. मात्र यातून भारताच्या पदरात काय पडले हा प्रश्नच आहे. दिखावा फार अन् ठोस अत्यल्प असेच वर्णन या दौऱ्याचे करावे लागेल.