पेठ – येथील श्री वाकेश्वर विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 3 हजार 63 रुपयांची मदत केली आहे. बालचमूंनी शनिवारी आपल्या खाऊचे पैसे पूरग्रस्तांना देऊन इतर मुलाला प्रेरित केले आहे. सकाळी प्रार्थनेच्या वेळी संजय पवळे व बाळासाहेब धुमाळ यांनी मुलांना आवाहन करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा सांगितल्या.
त्यानंतर प्रार्थना संपताच 5वी ते 10वीच्या मुलांनी 3 हजार 63 रुपये जमा करून शिक्षकांकडे दिले. यावेळी पेठ गावातील पूरग्रस्तांना मदत निधी जमा करणारे अतुल मोरडे, शुभम ढमाले, नितीश पवळे, प्रसाद तोडकर यांच्याकडे विद्यालयाचे संजय पवळे व अंकुश माठे यांनी ही रक्कम सुपूर्त केली. खाऊचे पैसे पूरग्रस्तांना दिल्याने सर्वांनी चिमुकल्यांचे कौतूक होत आहे.