शिवसेना विधेयकाला राज्यसभेत विरोध करणार
मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती विधेकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने मंगळवारी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केले. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे कोणीही आम्हाला शिकवू नये, असे ठणकावतानाच या विधेयकाबाबत जोपर्यंत समाधानकारक स्पष्टता येत नाही तोपर्यंत त्याला पाठिंबा देणार नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना या विधेयकाला राज्यसभेत विरोध करणार हे स्पष्ट झाले आहे.
मुस्लिमधर्मीय वगळता शेजारच्या देशातील हिंदू, खिश्चन, शीख, पारशी, जैन, बौध्द धर्मातील नागरिकांना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना विधेयकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या खासदारांनी विधेयकाबाबत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबद्दल जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आपला पक्ष राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणे म्हणजे देशभक्ती आणि त्यांच्या विरोधात मतदान करणे हा देशद्रोह, ही मानसिकता बदलायला हवी. या सर्वांपेक्षा देशात राहणाछया जनतेसमोरचे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या विधेयकाबद्दल देशाला अनेक प्रश्न पडले आहेत. ते आम्ही सभागृहात मांडले. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सूचवल्या आहेत, त्या सुधारणा करूनच राज्यसभेत विधेयक आले पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. जर विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात भीती असेल तर ती दूर करण्याची गरज आहे. शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हण