समता परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यवत- सरकारने केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणात केलेल्या कपातीच्या निषेधार्थ भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पुण्याचे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांना पुणे येथे त्यांच्या कार्यालयात बुधवारी (दि. 7) निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राम यांना ओबीसींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर सरकारला कळवून घटवलेले आरक्षण पूर्ववत ठेवावे, अशी निवेदनात मागणी केली आहे. ओबीसीची मागणी मान्य न झाल्यास पुणे जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. यावेळी समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, महिला जिल्हा अध्यक्षा ज्योती झुंरगे, चंद्रशेखर भुजबळ, पंढरीनाथ बनकर, सचिन रंधवे, मंगेश रायकर, रोहिदास कुदळे, विजय गिरमे, नीलम होले, वंदना बनकर, वंदना जाधव, समाज माध्यमाचे जिल्हा अध्यक्ष उमेश म्हेत्रे यांसह मान्यवर उपस्थित होते.