पुणे/मुंबई : सणासुदीच्या दिवसांत हमखास मागणी वाढणाऱ्या सोन्याकडे वाढलेल्या किंमती आणि आर्थिक मंदीच्या भीतीने ग्राहकांनी पाठ फिरवली.
सोन्याची जगातील दुसऱ्या सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या भारताच्या बाजारपेठेत गेल्या महिन्यांत दराने उच्चांक गाठला होता. त्यामुळे सराफ बाजारात सोन्याची विक्री ठप्प होण्या जोगी स्थिती निर्माण झाली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांच्या विक्रीला झळाळी येण्याची आशा होती. मात्र ती पूर्णपणे मावळली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दागिनम्यांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली, असे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सीलचे अध्यक्ष एन. अनंत पद्मनाभन यांनी सांगितले. ग्राहकांच्या मनात मंदी आणि वाढलेल्या किंमतीची भीती घर करून आहे.
दिवाळीनंतर लग्नाचा मोसम सुरू होतो. हा काळ सोन्याच्या विक्रीचा मोसम असतो. काही ग्राहक लग्नसराई आणि दिवाळीची एकत्रच सोने खरेदी करतात. त्यात यंदा वाढलेल्या किंमतीमुळे बदल झाल्याचे पहायला मिळाले, असे काही व्यावासायिकांनी सांगितले. सप्टेंबरच्या सुरवातीला सोन्याचा दर प्रतितोळा 39 हजार 885 होता. वर्षभरात तो प्रतितोळा 41हजार 500 च्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्राहकांनी पाठ फिरवल्याने सराफांनी कमी वजांच्या दागिन्यांकडे आपली वाट वळवली आहे. पुवी विवाह सोहळ्यात पाच दहा हजाराची सोन्याची वस्तू भेट देण्याकडे लोकांचा कल होता, पण आत एक ग्रॅम सोन्यालाच 4 हजार 500 रुपये मोजावे लागत असल्याने या रकमेत काहीच मिळत नाही. त्यामुळे लोक गिफ्ट व्हाउचर किंवा रोख आहेर देण्याचा प्रघात पाडू इच्छितात.