नवी दिल्ली : न्यायलयीन कक्षेत असणाऱ्या विषयावर मी बोलणार नाही, असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आरेतील वृक्षतोडीवर भाष्य करण्याचे टाळले. त्याचवेळी भारतात 15 हजार चौरस किमी जंगल वाढले आहे, असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे मी यावर काहीही भाष्य करणार माही.,असे जावडेकर म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र तुम्ही एक झाड कापत असाल तर पाच झाडे लावून ती वाढवण्याची हमी घेतली पाहीजे. दिवाळीत नागरिकांनी फटाके उडवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रदुषणाचा प्रश्न 2005-06मध्ये निर्माण झाला. मात्र, मोदी सरकार सत्तेवर आल्यावर ते या प्रश्नाला भीडले. त्यांनी या प्रश्नावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.