मुंबई – जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्रा प्रमाणे देशातील इतर भागांनमध्ये देखील भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्तापित होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, भाजपच्या या विजयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी भाजपच्या या प्रचंड मोठ्या विजयाला आकलन करता न येण्यासारखे आहे. असे म्हंटले आहे.
निवडणूक काळात राज यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नसून, राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले होते. ते व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यानिशी सादर देखील केले होते.
अनाकलनीय !#Verdict2019
— Raj Thackeray (@RajThackeray) May 23, 2019