मुंबई – आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावनिक ट्विट केले आहे. “महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.”अस त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे.
महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, १० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
ते पुढे म्हणतात की “जनतेने मला चारवेळा मुख्यमंत्री केल, देशाचा संरक्षण मंत्री केल.१० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको, अखेरच्या श्वासापर्यंत मला आता जनतेसाठी काम करायच आहे”, असे भावनिक साद घालणारे ट्विट त्यांनी केले आहे.
या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे. pic.twitter.com/K0EW0m8NJC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
दुष्काळ असो पाऊस असो निवडणुका असो तरी 78 वर्षांचे शरद पवार दौरे करताना दिसतात. यावर त्यांना अनेकदा विचारणाही होते, की या वयात देखील तुम्ही दौरे कसे काय करता ? यावर शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात की “या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.