उरुळी कांचन – हवेली तालुक्यात बाजारी काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मजूर मिळत नाही. त्यात पाऊस पडत असल्याने शेतकरी कुटुंबातील सदस्यांना घेऊन हातातोंडाशी आलेल्या बाजरीची काढणी करीत आहे.
हवेली तालुक्यातील यशवंत कारखाना बंद झाल्याने शेतकरी उसाऐवजी ज्वारी, अन्य पिकांचे उत्पादन घेऊ लागला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारीची पेरणी केली आहे. यावेळी हवेली तालुक्यात खरीपतील पिकांना पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक उतारा मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. परिसरात शेतमजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी कुटुंबातील लोकांना घेऊन काढणीची कामे करीत आहेत.