नवी दिल्ली : सोन्या, चांदीच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून सतत वाढत होत्या. दरम्यान, आज त्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमी झालेली मागणी आणि ज्वेलर्सकडून कमी झालेली मागणी पाहता दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचे पाहालया मिळत आहे. सोन ५० रुपयांच्या घसरणीसह ३२,४०० रुपये प्रति ग्रामच्या स्तरावर पोहोचली आहे. तसेच चांदी १५० रुपयांच्या घसरणीसह ४०,५५० रुपये प्रति.कि स्तरावर पोहोचली आहे.
२५ एप्रिल रोजी दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा २२५ रुपयांनी वाढून ३२,४५० रुपये प्रति दहा ग्रामवर दाखल झाली. चांदीची किंमतही 200 रुपयांनी वाढ होऊन ४०,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. अक्षय तृतीयानंतर जवळपास आठवड्याभरानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा चढ्या होत्या. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचा भाव ३२,२३० रुपये प्रति दहा ग्रामवर होता. परदेशात सोन्याची मागणी घटली असली तरी देशात मात्र लग्नसराईमुळे स्थानिक सोनारांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा