“ये रिश्ता क्या कहलाता है’ या सिरीयलमध्ये आता नाट्यमय वळण येणार आहे. या सिरीयलने नुकतेच आपले 3000 एपिसोड पूर्ण केले आहेत. एवढे एपिसोड पूर्ण करणारी ही पहिली डेली सोप ठरली आहे. “ये रिश्ता…’ मधील कार्तिक आणि नायरा हे एकत्र यावे, अशी प्रेक्षकांची खूप अपेक्षा आहे. कार्तिक आणि वेदिकाच्या लग्नानंतर आता काही कायदेशीर प्रक्रिया दिसणार आहे. आगामी भागात पायल नायर हिचा या सिरीयलमध्ये प्रवेश झालेला दिसेल. कार्तिक गोयंकाची वकील म्हणून ती सिरीयलमध्ये दिसणार आहे.