लीगलनेट फोरमच्या चर्चासत्रात तज्ञांचे मत
पुणे,दि.19 – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिन्दुस्तान देशातील न्यायपालीकेमध्ये जुन्या पद्धतीने कामकाज चालत असल्यामुळे वकील, पक्षकारांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधुनिक काळात न्यायपालीकेतील कामकाज देखील डिजीटल होण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ वकीलांनी व्यक्त केले
न्यायपालीकेतील कामकाज आधुनिक व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या लीगलनेट द्वारा आयोजित करण्यात आलेल्या लीगनेट फोरम या चर्चासत्रा दरम्यान वकील व तज्ज्ञांनी आपले मते व्यक्त केली. यावेळी माजी सत्र न्यायाधीश आर. व्ही. कुलकर्णी, पर्यावरण कायदे तज्ञ ऍड. असिम सरोदे, मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. सुकंद कुलकर्णी, ऍड. राजस पिंगळे, पुनीत कपूर, ऍड. अतुल जुवळे, लीगलनेट चे संस्थापक मंदार लांडे, गुरमीत सिंग, कपील जवेरी, चंद्रकांत भोजे पाटील, अनिरूध्द कोटगिरे, ऍड. हर्षद काटीकर, ऍड. अक्षदा गुदाधे, विजय देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.
ऍड. असीम सरोदे म्हणाले, हिंदुस्थानातील न्यायपालीकेमध्ये जुन्या काळात कायद्याचा पुस्तकांचा ढिग घेऊन वकील युक्तीवाद करताना पहायला मिळायचे. बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांच्या कार्यपध्दतीतही बदल होणे गरजेचे आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. फौजदारी खटल्यांना लागणारा कालावधी पाहता अशा खटल्यांमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. मात्र अशा खटल्यांमध्ये डिजीटल प्रणाली वापरासाठी पोलिसांचे सहकार्य देखील तीतकेच महत्वाचे आहे.
ऍड. पिंगळे म्हणाले, कागदपत्रे बाळगण्या पेक्षा प्रत्येक वकीलाने स्मार्ट फोन किंवा टॅबलेटचा वापरून करून त्यामध्ये कागदपत्रे जमा केली पाहिजे. त्यामुळे कागदपत्रे बाळगणे सोपे होऊन जाईल यावेळी देशभरातून अनेक वकिलांनी या चर्चा सत्रात सहभाग घेतला होता.