चिंबळी – चिंबळी फाटा ते चिबंळी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकव पुलाच्या जवळ असलेल्या ओढ्यालगत रस्त्याचा भराव पावसाने वाहून गेला असल्याने रस्ता खचला असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चार वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी साकव पुलांची उभारणी आली या पुलाच्या पूर्वेला 50 मिटर अतंराची संरक्षण भिंत उभारण्यात आली तर पश्चिमेस केवळ मजबूत भराव करण्यात आला होता.
पुलाच्या पूर्वेला असलेल्या संरक्षण भिंतीचे अंतर कमी असल्याने मुरूमाचा भराव खचला असून या रस्त्यावरुन जड वाहनांची कायमच वर्दळ असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरी प्रशासनाने त्वरीय याकडे लक्ष देत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.