नगर: पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले असून जल, जंगल आणि जमीन या तिन्ही गोष्टीचे संवधर्न करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता झाडे लावली पाहीजे. वृक्षलागवड बरोबरच वृक्षसंवधर्न करणे महत्त्वाचे आहे. झरेकरांनी सातत्याने गेली चार वर्षे या झाडांची निगा राखली हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नवांदे यांनी केले.
वाडीया पार्क येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने झाडे जगवल्याबददल वाडीया पार्क बॅडमिटन हॉलचे व्यवस्थापक भाउसाहेब झरेकर यांचा सन्मान जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नवांदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हरीयालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, पुणेजिल्हा क्रिडाअधिकारी सुभाष नवांदे, रोटरी सेंटलचे अध्यक्ष रोटे. गिरीश मुळे, रोटे.सचिव दत्ता दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबने वषापूर्वी वाडीयापार्क येथे झाडे लावली होती त्यामधील झाडे व्यवस्थित जगली आहेत ही झाड जगवायचे काम झरेकर यांनी केले.
रोटे.गिरीश मुळे म्हणाले, आज प्रत्येकाने प्रदूषणमुक्त वसुंधरा कशी होईल हे पाहीले पाहीजे यात लोकसहभाग हवा हवामानात सातत्याने बदल होत आहे पर्यावरण रक्षणाकरीता झाडे लावून समृध्द निसर्गाचे संरक्षण करावे. आम्ही केलेल्या कामाला झरेकरानी लावलेला हातभार महत्त्वाचा आहे.यावेळी बॅडमिटन हॉलचे सदस्य तसेच नागरीक उपस्थित होते.