मुंबई – मुंबई मधील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कदायक घटना घडली आहे. विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारत आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. ‘अक्षय सारस्वत’ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो उत्तरप्रदेशातून आला होता. सध्या पोलीस याघटनेची कसून तपासणी करत आहे.
आपल्या मृत्यूला कुणास जबाबदार धरू नये असे, तरुणाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचा सर्व प्रकार विमानतळावरील काही प्रवाशांनी चित्रित केला आहे. हा तरुण इमारतीवर बराच वेळ लटकत होता मात्र त्यास वाचवण्यास कोणी पुढे आले नाही.