उत्तर प्रदेश- केंद्रीय मंत्री व सुलतानपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मनेका गांधी आणि महाआघाडीचे उमेदवार चंद्रभद्र उर्फ सोनू सिंग यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सोनू सिंग यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.
#WATCH: Minor argument between Union Minister and BJP’s candidate from Sultanpur Maneka Gandhi and Mahagathbandhan candidate Sonu Singh after Gandhi alleged that Singh’s supporters were threatening voters. #LokSabhaElections #Phase6 pic.twitter.com/l2Pn1yCRVO
— ANI UP (@ANINewsUP) May 12, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघातील सपा-बसपा महाआघाडीचे उमेदवार सोनू सिंग आणि मनेका गांधी यांच्या समर्थकांमध्ये शनिवारी रात्री हाणामारी झाली होती. रविवारी सकाळी जेव्हा सोनू सिंग आणि मनेका गांधी हे दोन्ही उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह आमनेसामने आले त्यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. त्यावेळी मनेका गांधी यांनी सोनू सिंग यांना ‘तुमची दादागिरी चाळणार नाही’ असा इशारा दिला. तसेच सोनू सिंग यांचे कार्यकर्ते मतदारांना दमदाटी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे सुलतानपूर मतदारसंघात यावेळी भाजपच्या मनेका गांधी आणि महाआघाडीचे उमेदवार सोनू सिंग यांच्यातच मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे.