सोमवारचा दिवस हा विद्यमान आघाडी सरकारचा शेवटचा दिवस असेल असे भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. कुमारस्वामी यांनी सोमवारी विश्वास दर्शक ठरावावर मतदान घेण्याचे योजले आहे. त्यात त्यांचा शंभर टक्के पराभव होईल अशी आपल्याला खात्री आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आघाडीचे पंधरा आमदार मुंबईत आहेत. ते पुर्णपणे सरकारच्या विरोधात आहेत. आणि त्यांच्यावर व्हीप बजावण्याचा प्रयत्न या सरकारने केला तरी तो यशस्वी होणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे असे ते म्हणाले. आपले सरकार जाणार याची खात्री पटल्यानेच आता कुमारस्वामी हे घाईगडबडीत काही महत्वाचे निर्णय घेत आहे ते लोकशाहीला धरून नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.