लीड्स – मधल्या फळीतील फलंदाजीचे कोडे सोडण्यासाठी भारताकरिता श्रीलंकेविरूद्ध आज येथे होणारा अखेरचा साखळी सामना आगामी उपांत्य लढतीपूर्वीची रंगीत तालीम असणार आहे. स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा लंकेकडून प्रयत्न होईल अशी अपेक्षा आहे.
विश्वचषक स्पर्धेत प्राथमिक फेरीतील भारत विरूध्द श्रीलंका या सामन्यास काही वेळातच लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करूणारत्ने याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Sri Lanka win the toss and elect to bat first.#CWC19 pic.twitter.com/QloPu48Sbn
— BCCI (@BCCI) July 6, 2019
दरम्यान, भारताने साखळी गटात दुसरे स्थान घेत यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. आजचा सामना जिंकून आघाडीस्थान घेण्याची त्यांना संधी आहे. श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्युज याचा हा अखेरचा विश्वचषक सामना असण्याची शक्यता आहे. निवृत्त होण्यापूर्वी चमकदार खेळ करण्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा आहे.