पाहुणे, यात्रेकरूही उघड्यावरच शौचास
कारवाई करणार तरी कशी?
माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर, दहिवडी, वारुगड, बिदाल, बिजवडी, मोही अशा मुख्य गावच्या यात्रेसाठी आलेले पाहुणे तसेच यात्रेकरुंना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. तसेच ग्रामस्थही नियमित उघड्यावरच शौचास जात आहेत. हागणदारी मुक्त धोरणानुसार ग्रामपंचायतींकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाई केली जात नाही. कारण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही तर शौचालयास सरकार पाणीपुरवठा कसा करणार हाच प्रश्न आहे.
आकाश दडस
बिदाल – माण तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 70-80 टक्के कुटुंबांकडे शौचालयाची सोय आहे. परंतु, अनेक गावातील शौचालये आता नादुरुस्त आहेत. स्त्रियांना लाजेकाजेस्तव पहाटे किंवा रात्री शौचास जावे लागते. लहान मुले तर रस्त्यावर किंवा घराजवळच बसतात. म्हसवड आणि दहिवडी या शहरात झोपडपट्टया किंवा अनधिकृत वस्त्यांमध्ये जागेची समस्या असल्याने शौचालये नाहीत. अशा ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले आहेत, पण त्यांचा वापर नीट होत नाही.
माण तालुक्यात अनेक खेड्यांमध्ये घरामध्ये शौचालय नसल्यामुळे पुरुष तसेच माता भगिनींना उघड्यावर शौचास जावे लागते. काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. परंतु, पाण्याअभावी तसेच नियमित साफसफाई नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी त्यांचा वापर होत नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्यामुळे मुलींची कुचंबणा होते. उघड्यावरील मलमूत्र विसर्जनाने अनेक संसर्गजन्य आजार बळावत आहेत. परिसरातील जलसाठे, पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे. खेड्यात अजूनही अनेकांना उघड्यावर जावे लागण्यास नागरिकांबरोबर शासन-प्रशासनही जबाबदार आहे. शासन-प्रशासनाने हा विषय अधिक गांभीर्याने घेऊन कामाला लागायला हवे. उघड्यावरील मलमूत्र विसर्जनाने अनेक संसर्गजन्य आजार बळावत आहेत.
परिसरातील जलसाठे, पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे. खेड्यात अजूनही अनेकांना उघड्यावर जावे लागण्यास नागरिकांबरोबर शासन-प्रशासनही जबाबदार आहे. शासन-प्रशासनाने हा विषय अधिक गांभीर्याने घेऊन कामाला लागायला हवे. उघडयावर मैला पडल्याने मानवी वस्तीचा आणि मळाचा संपर्क निरनिराळया प्रकारे होतो. यामुळे त्यातले जीवजंतू मानवी अन्नसाखळीत फिरत राहतात. हात, पाय, पाणी, भाजीपाला, माशा या सर्वांमधून रोगराई घराघरात पसरते. पटकी, कावीळ, अतिसार,जंत, विषमज्वर, आव या आजारांचा सर्वत्र कमीजास्त प्रमाणात प्रभाव आहे. या आजारांमुळे बालपणापासून कुपोषणाची समस्या मागे लागते. यामुळे भूक कमी लागणे, पचन कमी होणे, खाल्लेले अंगी न लागणे असे दुष्परिणाम होतात. आजार आणि रोगराईमुळे आर्थिक तोटाही होतो. ही सर्व समस्या आरोग्यसंवादातून कुटुंबा-कुटुंबांना नीट समजावून सांगायला पाहिजे व लोकांनीही स्वच्छता अभियानात सामील होण्याची गरज आहे.