कोलकाता- २०१९ लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. दरम्यान, बंगालमध्ये मोदी सरकारला रोखण्यात अपयश आल्यामुळे आणि अपेक्षेइतकं यश देखील मिळवता आलं नाही. त्यामुळे “मला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहायचं नसून, मला जनतेत जाऊन काम करायचं आहे”. असं सांगत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
West Bengal CM Mamata Banerjee: I told at the beginning of the meeting that I don't want to continue as the Chief Minister. pic.twitter.com/KZvH9oyTec
— ANI (@ANI) May 25, 2019
यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 42 जागांपैकी 18 जागांवर भाजपने सत्ता बळकावली असून, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत तृणमूलला 2014 पेक्षा 12 जागा कमी मिळाल्या आहे. तर, गेल्या निवडणुकीत भाजपने फक्त 2 जागा मिळवल्या होत्या.