दौंडच्या पूर्व भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन
राजेगाव – राजेगाव हे दौंड तालुक्यातील एक प्रगतशील गाव आहे. या भागातील भीमा नदीच्या पात्राची पाणीपातळी कधीही कमी झालेली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी पाऊस सरासरीने कमी झाला. सध्या दरवर्षीच तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी कमी होत असल्याने पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी मुळशी भागातील पाणी आपल्याकडे आणण्यासाठी आणि येथील नदी पात्रावर बुडीत बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राहुल कुल यावेळी सांगितले.
राजेगाव (ता. दौंड) येथील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी “भीमा पाटस’चे संचालक शहाजी जाधव, मुकेश गुणवरे, “रासप’चे युवक अध्यक्ष सचिन खैरे, मालोजी मोरे, जनार्दन भोसले, भारत खराडे, प्रकाश खैरे, नवनाथ लोंढे, चंद्रकांत मोरे, महादेव बगाडे, बाळासाहेब ढमे, पोलीस पाटील महेश लोंढे, शिवाजी गुणवरे, महेश कडू, हनुमंत खरात, मनोज भोसले, एन. डी. गुनवरे,अमोल मोरे, अरुण भोई, अमोल इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेगाव परिसरात 15 कोटी 59 लाख रुपयांची विविध विकासकामे झाली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, गटार योजना,सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत, तर काही कामांचे भूमीपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील म्हणजे खानोटा येथे 5 कोटी 65 लाख, नायगाव आणि वाटलूज येथे 4 कोटी 98, मलठण 13 कोटी 46 लाख, लोणारवाडी येथे 20 लाख अशा अनेक विकासकामांचा शुभारंभ आणि काही कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी आमदार कुल यांच्या हस्ते झाला. या कार्याक्रमासाठी मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.