मारुती छोट्या कारचे उत्पादन कमी करणार
नवी दिल्ली – पुढील एप्रिलपासून उत्सर्जनाचे नवे मानदंड लागू होणार आहेत. त्यामुळे डिझेलवरील कार महाग होणार आहेत. अशा कारचे उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न बहुतांश कंपन्या करणार आहेत. मात्र ग्राहकाला आमच्या कार परवडणार असतील तर आम्ही त्या डिझेलच्या कारचे उत्पादन चालूच ठेवू, असे मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे.
या कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एप्रिल महिन्यापासून बीएस 6 हे उत्सर्जनाचे नवे मानदंड लागू होणार आहे त्यामुळे डिझेलवरील छोट्या कार ग्राहकांना परवडणार नाहीत. इतर कार ग्राहकांना परवडू शकतात. त्यामुळे छोट्या कारचे उत्पादन काही प्रमाणात कमी केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून बहुतांश कंपन्या उत्पादन काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता आहे.
या कंपन्या इतर इंधनाचा इंधनावर चालणाऱ्या कारचे उत्पादन करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मारुती सुझुकी कंपनीचा भारतातील कार बाजारातील वाटा 51 टक्के आहे तो नव्या तंत्रज्ञानामुळे कमी होईल का असे विचारले असता त्यांनी असे काही होणार नसल्याचे सांगितले. आम्ही नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासावरही भर देत आहोत असे ते म्हणाले. यामुळे आगामी काळात मारुती सुझुकी नव्या तंत्रज्ञानावरील कारचे उत्पादन वाढविणार आहे. त्यामुळे एकूण बाजारातील आमचा वाटा कमी होणार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केला.