हैदराबाद – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी पक्षाने प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवले. परंतु कॉंग्रेसचे प्रियांका कार्ड फेल झालेले दिसत आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसला पारंपरिक मतदारसंघ अमेठीतही जिंकता आले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये विजय झाला, कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम मतदार आहेत. देशात मुस्लिमांसाठी जागा हवी पण मुस्लिम समाजाला कोणाची भीक नको अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी जनसभेला संबोधित करताना केली आहे.
Asaduddin Owaisi, AIMIM: The Congress leader himself lost in Amethi & received victory in Wayanad. Isn’t the 40% population of Wayanad Muslim? (09.06.2019) https://t.co/PxQJm7wWbz
— ANI (@ANI) June 9, 2019
तेलंगणा येथे खासदार ओवेसी यांनी जनसभेला संबोधित करताना सांगितले की, ‘काँग्रेसला ताकद, विचार आणि कठोर मेहनत घेण्याची इच्छा नाही. देशभरात भाजपा कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमेठीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या दिवशी भारत स्वातंत्र झाला त्यावेळी आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. हा भारत गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यावधी लोकांचा असेल. मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत असंही ते म्हणाले.