पर्यावरण मंत्रालयासाठीच्या निधीत वाढ; प्रदूषण नियंत्रणावर भर
केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरण मंत्रालयासाठीच्या निधीत 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्या मंत्रालयाला 2 हजार 954 कोटी रूपये उपलब्ध होतील. प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. हवा प्रदूषण कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांना आणि वनीकरणाला चालना देणे ही उद्दिष्टे समोर ठेऊन अनेक पाऊले उचलली जाणार आहेत.
प्रदूषण नियंत्रणासाठीच्या योजनांसाठी 460 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वेळी ती केवळ 5 कोटी रूपये इतकी होती. हरित भारत, स्वच्छ ऊर्जा या संकल्पनांचा पाठपुरावा केला जाणार आहे. पर्यावरणाकडे लक्ष देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचा उल्लेख हरित अर्थसंकल्प म्हणूून केला आहे.