नवी दिल्ली – 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांतील 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. दिल्लीच्या चांदनी चौक, नवी दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली या भागांमध्ये आज मतदान होत आहे.
Congress President Rahul Gandhi after casting his vote: The election was fought on key issues including demonetization, farmer problems, Gabbar Singh Tax and corruption in #Rafale. Narendra Modi used hatred in the campaign and we used love and I am confident love will win pic.twitter.com/gE1BgvQzPc
— ANI (@ANI) May 12, 2019
काँग्रेस अध्यक्ष ‘राहुल गांधी’ यांनी देखील सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिल्लीतील औरंगजेब या भागातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राहुल गांधींनी ज्या भागातून मतदान केले आहे. त्या ठिकाणी काँग्रेस उमदेवार अजय माकन यांची लढत भाजपचे उमेदवार मीनाक्षी लेखी यांच्या विरोधात आहे. मतदान झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकारांशी सवांद देखील साधला आहे. ही निवडणूक गब्बर सिंग टॅक्स आणि भ्रष्टाचारासह राफलेमधील प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेत द्वेष केला आणि आम्ही प्रेम वापरले असून, मला विश्वास आहे यावेळी प्रेम जिंकेल. असं राहुल गांधी म्हणाले.