वाल्हे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज जेजुरीतील मुक्काम हलवत पालखी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच वाल्ह्यामध्ये पोहोचली आहे. यानिमित्ताने लोखोंच्या संख्येने पायी चालत वारकरी पालखी सोबत वाल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. याठिकाणी आज माऊलींची पालखी मुक्कमी असणार आहे.
दरम्यान, यावेळी पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ‘आरोग्यदूत’ योजने अंतर्गत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आता, पर्यंत बहुसंख्य वारकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.