फलटण: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने आज ऐतिहासिक नगरी फलटणमध्ये विसावा घेतला आहे. या सोहळ्यासाठी वारकरी, दिंडीकरी आणि भाविक या सर्वांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान, या पालखी सोहळ्यात चार- साडेचार लाख वारकरी समाविष्ट झाले आहेत. या वारकऱ्यांचे नियोजन कसे होते. त्यांचा दिनक्रम कसा असतो. काही खेडे गावात देखील पालखी मुक्कामी असते. मात्र, गावात नेमके एवढ्या साऱ्या वरकाऱ्यांचे कसे नियोजन होते या संदर्भात घेतलेला आढावा.