नॉटिंगहॅम – शतकवीर शिखर धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरूध्द सलामीच्या जोडीत के.एल.राहुल हा रोहित शर्मा कितपत साथ देईल याचीच चिंता भारतीय संघ व्यवस्थापनास निर्माण झाली आहे, अस असलं तरी आमच्यावर कोणतेही दडपण नाही अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.
धवनच्या अनुपस्थितीतही आमचा संघ बलवान आहे आणि सलग तिसरा विजय मिळविण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत. धवन हा भक्कम फलंदाज आहे याबाबत मला कोणतीही शंका नाही. तरीही शेवटी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे व संघातील प्रत्येक घटक मोलाची कामगिरी करीत असतो. राहुलदेखील सलामीचाच फलंदाज आहे. तसेच अकराव्या खेळाडूपर्यंत आमच्याकडे आक्रमक फलंदाज आहेत त्यामुळेच आजचा सामना जिंकण्याची मला खात्री आहे असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.